Share

‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: सांगलीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. ‘राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही. कारण ५४ आमदारांच्या वर त्याला आम्ही जाऊ दिले नाही. सगळं आयुष्य गेलं, कधी ६० वर तो गेला नाही, अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर एकेरी भाषेत टीका केली होती. आता त्यांच्या या वक्तव्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

सांगलीत शरद पवारांचा एकेरी उल्लेख अनावधानाने झाला आहे. माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे. ते विरोधक जरी असले तरी अनादर कधीच नाही. अनेक वेळेला मी त्यांची स्तुती करताना असं म्हणत असतो, की प्रमोदजी आम्हाला सांगायचे मुख्यमंत्री होताना शरद पावर यांनी ४० गोष्टी लिहून काध्य्ल्या. त्यापैकी ३८ गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे अनावधानाने जो उल्लेख झाला आहे, राष्ट्रवादीकडून ज्या प्रतिक्रिया येत आहेत, त्यावर मला म्हणावे वाटते की आपल्यापेक्षा ज्येष्ठ माणसाचा अनादर हे आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदू संस्कृतीने आम्हाला शिकविलेले नाही. अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. आता त्यांनी आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देत परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!