Share

‘ओबीसी समाजाला शांत करण्यासाठी आध्यादेश काढून लॉलीपॉप देण्याचा प्रयत्न’

Published On: 

🕒 1 min read

पुणे: ओबीसी राजकीय आरक्षणाचा महाविकास आघाडी सरकारने काढलेला आध्यादेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा टीकेची झोड उठली आहे. महाविकास आघाडी सरकारवर सध्या सर्वच स्तरातून टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या दोन वर्षात महाआघाडी सरकारने कोर्टात जिंकली अशी एक तरी केस दाखवावी. मराठा आराक्षण (Maratha Reservation), ओबीसी आरक्षण (OBC Reservation), ग्रामपंचायत सरपंच, परमबीरसिंह (Parambir singh) अशा सर्वच विषयात महाविकास आघाडी सरकार कोर्टात हरले आहे. पण खड्ड्यात जाऊन देखील या सरकारला काहीच फरक पडत नाही. कारण त्यांना फक्त वसूली करायची आहे, अशी टीका भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

ओबीसी आरक्षणावरून चंद्रकांत पाटील यांनी चांगलाच निशाणा साधला आहे. ओबीसी समाजाला शांत करण्यासाठी आध्यादेश काढून लॉलीपॉप देण्याचा प्रयत्न केला. ओबीसी समाजाची फसवणूक राज्य सरकारने केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे खूप मोठे संकट निर्माण झाले आहे. आता नगरपरिषद, महापालिकांच्या नियोजित निवडणुका कोणत्या पद्धतीने होणार, रद्द होणार की जिल्हा परिषदेच्या झाल्या तशा ओबीसी आरक्षणशिवायच होणार, हे आयोगाने स्पष्ट करावे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!