Share

‘मोदींच्या बाललीलांचे पुरावे द्यायचे नसल्याने भविष्यात मोदींमुळे विश्वाची उत्पत्ती झाली, असेही चंद्रकांत पाटील बोलू शकतील’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरून विधानसभा मतदारासंघाचे आमदार चंद्रकांत पाटील पुन्हा एका नव्या विधानामुळे चर्चेत आलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, असं अजब विधान चंद्रकांत पाटलांनी केलंय.

युवा वॉरियर्स अभियानात बोलताना पाटील यांनी देशभक्त मुस्लिम आणि देशद्रोही मुस्लिम यांच्यातला फरक समजावून सांगितलाय. काश्मिरमध्ये बॉम्बस्फोट करणारा मुस्लिम देशद्रोही तर देशसाठी झटणारा मुस्लिम देशभक्त मुस्लिम असल्याचं पाटील यांनी म्हंटलय.

आपला सगळ्या मुस्लिमांना  विरोध नाही. तर देशद्रोही मुस्लिमांना विरोध आहे. मात्र, काही जण नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध काहीतरी काळंबेरं पसरवत असतात. पण अब्दुल कलाम यांच्यासारख्या कर्तृत्ववान माणसाला, संशोधक माणसाला नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती केलं, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं.

दरम्यान, यावर कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत भाष्य केले आहे. ‘एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले. तेंव्हा मोदींमुळे झाले हे सांगितले नाही. आता अटलजी व एपीजे अबुल कलाम ही नाहीत. चायवाला म्हणून व पदवी घेताना कोणी पाहिले नाही. मोदींच्या बाललीलांचे पुरावे द्यायचेच नसल्याने भविष्यात मोदींमुळे विश्वाची उत्पत्ती झाली, असेही चंद्रकांत पाटील बोलू शकतील’, अशा आशयाचे ट्वीट करत सावंत यांनी चंद्रकांत पाटीलांवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!