🕒 1 min read
पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडीने आठ तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली आहे. नवाब मलिक यांना ३ मार्च पर्यंत ईडीची कस्टडी मिळाली आहे. या मुद्द्यावरून आता विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप नेत्यानी आता नवाब मलिक यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, गुन्हेगारांना पाठीशी घालणारं हे सरकार वठणीवर आणावं लागेल, असं पाटील म्हणाले. तसेच नवाब मलिकांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची देखील त्यांनी मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
‘टेरर फंडिंगच्या लिंक्सच्या आधारेच नवाब मलिकांवर कारवाई’ – देवेंद्र फडणवीस
“धोनी माझा प्रेरणास्थान” ; भारतीय महिला क्रिकेटमधील स्टार रिचा घोषचे वक्तव्य
विराटचा ‘हा’ नवीन लूक बघून चाहते म्हणाले “हे तर रब ने बनादी जोडी २”
IND vs SL: श्रीलंका विरुद्ध पहिल्याच सामन्यात रोहित सामील होऊ शकतो विराट आणि धोनीच्या यादीत!
IND vs SL: भारताची श्रीलंका विरुद्ध मालिका आजपासून सुरु होणार!


