Share

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची टीका; म्हणाले,“आम्ही आमचं काम…”

Published On: 

🕒 1 min read

कोहापूर : काल (१७ मार्च) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यात भाजपला पुन्हा येऊ देणार नाही, असे वक्तव्य केले होते. दरम्यान, शरद पवारांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच लोकशाहीत कुणालाही काहीही बोलायचा अधिकार आहे. पण गरजेल तो पडेल काय? असा सवालही पाटलांनी केला आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना चंद्रकांत पाटील म्हणाले की,‘लोकशाहीत कुणालाही काहीही बोलायचा अधिकार आहे. परंतु गरजेल तो पडेल काय? आम्ही आमचे काम शांतपणे करतोय. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत ते दिसेल.’ तसेच राजकीय नेत्यांनी त्यांची बोलण्याची-वागण्याची संस्कृती बदलायला हवी, असेही पाटील म्हणाले.

दरम्यान, पवार आणि महाविकास आघाडीच्या आमदारांची सिल्वर ओकवर बैठक झाली. ही बैठक जवळपास दोन तास चालली. बैठक संपून आमदार निघण्याच्या तयारीत असताना शरद पवार उभे राहिले. ‘त्यांनी आपले दोन्ही हात वर करीत आणि वज्रमूठ तयार करून, घाबरायचे काही कारण नाही. मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देत नाही,’ असा आत्मविश्वास यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!