पुणे – बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भात प्रामुख्यानं चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तसंच यवतमाळ, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांच्या काही भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकण विभागातील काही भागांमध्ये आज आणि उद्या गडगडाटी वादळं आणि विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
आज मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी राज्याच्या सर्वच भागात राहील. उद्यापासून पावसाचा जोर हळूहळू कमी होऊ लागेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान, उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशा किनारपट्टीवर काल रात्री धडकल्यानंतर गुलाब चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला आहे. छत्तीसगडकडे जाताना आज हे वादळ दुपारपर्यंत ओडिशातून पुढे सरकण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळानं प्रभावित झालेल्या भागातून अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झाल्याचं वृत्त नाही. ओडिशाच्या काही जिल्ह्यांमध्ये काल रात्रीपासून हलका ते मध्यम पाऊस अधूनमधून पडत आहे. कोरापुट, रायगडा, गजपती आणि मलकानगिरीसारख्या दक्षिण ओडिशातील जिल्हा प्रशासनानं भूस्खलन होण्याच्या आधी सुमारे चाळीस हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
- १ ऑक्टोबरपासून बँकेतील नियमासह ‘या’ पद्धतीत होणार बदल
- पायातून रक्त वाहत असतानाही सीएसकेचा ‘हा’ खेळाडू मैदानावरून हटला नाही; फोटो व्हायरल
- पंकजा मुंडेंना धक्का! ‘वैद्यनाथ’ साखर कारखान्याचा ब्लॅक लिस्टमध्ये समावेश
- भाजपने मनाचा मोठेपणा दाखवला; रजनी पाटील यांनी मानले भाजप नेत्यांचे आभार
- राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या रजनी पाटील यांचे चंद्रकांतदादांनी केले अभिनंदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
