मुंबई: मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेलता पावसाने दोन दिवस पश्चिम महाराष्ट्रात उघडीप दिली. याचबरोर पुण्यात पावसाचा जोर वाढल्याने धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून खडकवासलासह अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याशिवाय कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा, परभणी, वर्धा, नांदेड, अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आजही राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्यात अजूनही ऑरेंज अलर्ट सुरू आहे.
मुंबईत शुक्रवारी पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं होतं, यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. तसंच लोकल सेवेवरही पावसाचा परिणाम झाला होता. लोकल १५ ते २० मिनिटे उशिरा धावत होत्या. पुण्यातही पावसाचा जोर वाढला असल्यानं बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला.
तर काही जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील अनेक भागात पाऊस गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे. आज हवामान विभागान रत्नागिरीसह पुणे आणि विदर्भातील काही ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Eggless Mayonnaise Recipe | घरी अंड्याशिवाय मेयोनीज कसे बनवायचे, जाणून घ्या रेसिपी..!
- Hair Tips | केस गळती थांबवायची असेल तर वापरा ‘हे’ घरघुटी उपाय…
- Nana Patole | नरेंद्र मोदींच्या वाढदिवसा दिवशी नाना पटोलेंनी केले गंभीर आरोप, म्हणाले…
- JIO VS AIRTEL | जिओ ने पुन्हा एअरटेल आणि VI ला टाकले मागे, एकाच महिन्यात जोडले इतके नवीन वापरकर्ते
- Amit Shaha | अमित शहांच्या सुरक्षा व्यवस्थेत पुन्हा हलर्जीपणा शहांच्या गाडीसमोर TRS नेत्याने ताफ्या सोमर केली गाडी पार्क
- इलेक्ट्रॉनिक टॅटू म्हणजे काय? जे 2030 पर्यंत पुसून टाकेल पृथ्वीवरून स्मार्टफोनचे अस्तित्व..जाणून घ्या!


