औरंगाबाद : केंद्रशासनाने आणलेले शेतकरी विरोधी कायदे त्वरित रद्द करावे या मागणीसाठी शनिवारी (दि.५) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने टी पॉइंट, जळगाव हायवे रोड, पैठण रोड, जालना बदनापूर रोडरोड याठिकाणी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येत आहे.
केंद्रशासनाने तीन कायदे आणले आहेत ते रद्द करावे, शेतकऱ्यांकरीता एमएसपी कानूनचा नवीन कायदा करून सरकारने एमएसपीची हमी द्यावी. याशिवाय शेतातील लाईनबील पहिल्या पद्धतीनेच ठेवावी. नवीन लाईनबिल आणून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडू नये. फार्मिंग ऍक्ट मध्ये शेतकऱ्यांचा जो अधिकार आहे तो त्यांना द्यावा. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारचे माल दिले तरच कंपनी घेणार.
जर माल खराब झाला तर त्याला जबाबदार कोण? त्या शेतकऱ्यांचे काय? असे प्रश्न यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने व्यक्त केले. तसेच शेतकऱ्यांना कोर्टात जाता येणार नाही? तर मग शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे? असा प्रश्न देखील उपस्थित करत शेतकरी विरोधी आणि अन्यायकारक कायदे रद्द करण्यात यावे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गजानन बंगाळे आणि इतर शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- सामाजीक सुरक्षा कायद्यात उसतोड मजुरांचा समावेश करण्यात यावा: आमदार धस
- ‘चायना आणि पाकिस्तानच्या सीमेवर जेवढा बंदोबस्त नाही इतका शेतकऱ्यांसाठी केलाय’
- गेल्या वर्षभरात खडसे,सरनाईक यांच्यासह ‘या’ दिग्गज नेत्यांना आल्या आहेत ईडीच्या नोटीसेस
- यामुळे झाले ह्युन्दाईच्या क्रेटाचे डीझेल मॉडेल बंद !
- ग्रेटा थनबर्गला अभिनेता प्रकाश राज यांचा पाठिंबा, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
