Share

उस्मानाबादेत चाैदा दुकानांना सील, व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

Published On: 

उस्मानाबाद: जिल्ह्यात संचारबंदी लावण्यात आलेली असताना सुद्धा काही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडी ठेवल्याने कारवाई करण्यात आली आहे. कळंबचे तहसीलदार रोहन शिंदे यांनी ग्रामीण भागात अचानक भेटी देण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान जिल्हाधिकारी यांच्या कोविड संदर्भातील आदेशाचे उल्लंघन करताना निदर्शनास आलेल्या १४ व्यावसायिकांच्या दुकाने सील करण्यात आल्या. त्यामुळे व्यावसायिकांंमध्ये खळबळ उडाली आहे.

तालुक्यात कोरोनाचा आकडा चार हजारांचा पल्ला पार करून गेला आहे. पहिल्या टप्प्याच्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यात वाढीचा वेग जास्त आहे. गंभीर रुग्णांची संख्या जास्त आहे. यामुळे जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्या निर्देशानुसार विविध निर्बंध घालण्यात आले आहेत.यात प्रामुख्याने किराणा, भाजीपाला, फळ, दूध, मिठाई, आदी अत्यावश्यक अनुषंगिक दुकानांना केवळ सकाळी ७ ते ११ या काळात सुरू ठेवता येणार आहे.

एकूणच अत्यावश्यक बाबी वगळता इतर आस्थापना तर पूर्णपणे बंद राहतील, अशा सक्त सूचना दिल्या आहेत. असे असताना काही व्यावसायिक प्रशासनाचे हे नियम ‘धाब्यावर’ बसविण्याचे काम करीत आहेत. दरम्यान, कळंबचे तहसीलदार रोहन शिंदे यांनी कोरोनावर मात करीत नुकतीच पुन्हा कामकाजास सुरुवात केली आहे. त्यांनी आता ग्रामीण भागात अचानक भेटी देण्यास सुरुवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!