बुलडाणा: देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीदरम्यान बेरोजगारी, गरिबी, शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन आणि देश विकून देश चालवणार्या केंद्राच्या व्यवस्थेच्या विरोधात आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो होतो, मात्र तेथील जनतेने कुठल्या मुद्द्यांवर मतदान केले, या संदर्भात आम्ही आत्मचिंतन करून पुढील निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हणलं आहे. ते बुलडाण्यातील शेगाव येथे आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
२८ मार्च रोजी छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेन आणि गुजरातचे युवानेते हार्दिक पटेल यांच्या उपस्थितीमध्ये शेगाव येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, त्याच्या नियोजनासाठी आज नाना पटोले हे शेगाव दौऱ्यावर आले होते. दरम्यान त्यांनी राज्य सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाचे खापर केंद्राच्या सरकारच्या डोक्यावर फोडले आहे.
महत्वाच्या बातम्या :
मुंबई पोलीस जाणार फडणवीसांच्या घरी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निर्णय
काजल अग्रवाल लवकरच होणार आई; सोशल मीडियावर शेअर केले ग्लॅमरस फोटो
Drone Farming: उस्मानाबाद जिल्ह्यातील 8 तालुक्यात प्रत्येकी 1 ड्रोन देण्यात येणार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

