Share

केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था बदलण्यासाठी कोणताही प्लॅन नाही : प्रकाश आंबेडकर

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला आज अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखोहून अधिक अनुयायी येतात. पण यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातूनच अभिवादन करण्याचे अनुयायांना राज्य सरकारने आवाहन केले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसह वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर कोरेगाव-भीमाला पोहोचले असून त्यांनी शौर्यदिनानिमित्त विजय स्तंभाला अभिवादन केलं आहे.

केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था बदलण्यासाठी कोणताही प्लॅन नाही, फक्त आदेश काढण्याचे काम सरकार करत असल्याचे म्हणत आंबेडकरांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.कोरेगाव भीमा दंगलीसंदर्भात आज बोलणं योग्य ठरणार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

आतापर्यंत मुंबई लोकल सुरू व्हायला हवी होती. दोन्ही सरकारकडे निर्णयक्षमता नसल्याचेही ते म्हणाले. ते एल्गार परिषदेबाबत बोलताना म्हणाले की, कोळसे पाटलांना एल्गार परिषद घ्यायची असेल तर त्यांनी घ्यावी. मला आणि न्यायमूर्ती पी बी सावंतांना, जी घ्यायची होती ती आम्ही घेतली आणि त्याचा उद्देश देखील साध्य झाल्याचे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!