Share

जालना-परभणी जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्याचा मार्ग मोकळा, २२८ कोटींच्या निधीला केंद्राची मंजूरी

Published On: 

🕒 1 min read

जालना : जालना आणि परभणी या मराठवाड्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. या मागणीला अखेर यश मिळाले असून या रस्त्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने २२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या संदर्भात शेगाव ते पंढरपूर दिंडी मार्गाच्या भूमिपूजन समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आश्वासन दिले होते. मात्र, आता निधी मंजूर झाल्याने त्या आश्वासनाची पूर्तता झाली, असे म्हणता येईल. वाटुर फाटा ते चारठाणा असा २७ किलोमीटर लांबीचा हा रस्ता दोन्ही जिल्ह्यांना जोडतो. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा होणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूकही सुरळीत होईल आणि वाहन धारकांचा वेळ वाचेल.

दिलेल्या शब्दाला जागणारा नेता ही गडकरी यांची ओळख असून यातून हे पुन्हा एकदा सिद्ध होत असल्याची प्रतिक्रीया माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल त्यांनी गडकरी तसेच केंद्र सरकार यांचे आभारही मानले आहेत. या रस्त्यामुळे मराठवाड्यातून हैदराबादकडे जाणाऱ्या वाहतूकीस फायदा होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या    

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!