नवी दिल्ली:- मी माझ्यासोबत सहा महिन्यांचे अन्नधान्य आणले आहे. केंद्र सरकार जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत मी परत जाणार नाही, अशी रोखठोक भूमिका WWE च्या रिंगणात मातब्बर पहिलवाणांना धूळ चारणारा द ग्रेट खलीने मांडली आहे. द ग्रेट खली आता शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे. खलीने काल दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली. केंद्र सरकारने कृषी कायद्यासह शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी खलीने केली आहे.
शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने अन्नधान्य विकत घेतलं जात आणि सर्वसामान्य नागरिकांना ते २०० रुपयांमध्ये विकले जाते. त्यामुळे सर्वसामान्य गरीब, होतकरु मजुरांचे प्रचंड नुकसान होते. सर्वांनी शेतकऱ्यांसोबत उभं राहावं, जेणेकरुन केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मजबूर होईल, अशी विनंती खलीने केली आहे.
खलीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो शेतकऱ्यांचा समस्या मांडत आहे. सरकारची गाठ आता पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांसोबत आहे. मी सहा महिन्यांचं राशन सोबत घेऊन आलो आहे. त्यामुळे मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथेच ठाण मांडून राहणार, असा इशारा खलीने दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- उदयनराजेंचे ‘ते’ वक्तव्य धक्कादायक आणि आक्षेपार्ह आहे : सचिन सावंत
- मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 9 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असणार
- दातृत्वाचा भाव देश व समाजाला पुढे घेऊन जातो – राज्यपाल
- भारताने मालिका गमावली पण या पट्ठ्यानं मनं जिंकली!
- केंद्राकडून नेमके किती येणे बाकी आहे यावर आधी एकमत करा; दरेकरांचा सत्ताधाऱ्यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

