औरंगाबाद : लातूरमध्ये मृतदेहांची अदला-बदली झाली होती. अक्षरशः दफन केलेला मृतदेह बाहेर काढावा लागला होता. अशी गंभीर घटना होऊनसुद्धा सरकारने अजून कारवाई केली नाही. तसेच आरोग्य सेवेसाठी सरकार गंभीर नसून उपाय योजना प्रभावी पणे दिसून येत नसल्याचे आ. अतुल सावे यांनी सांगितले.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहाची अदला-बदली लातूर जिल्ह्यामध्ये झाली होती. यामध्ये दफन झालेला मृतदेह जमिनीतून उकरुन काढण्यात आला होता. तो मृतदेह पुन्हा खऱ्या नातेवाईकांना देण्यात आला होता. त्यामुळे राज्यभर या घटनेचे पडसाद उमटले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
राज्यसरकार ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधी अशा आरोग्य सेवेवर गांभीर्याने बघत नसून सामान्य नागरिकांची हेळसांड होत आहे. मृतदेह बदल होणे हि रूग्णालयाची चूक आहे. त्याचे गांभीर्य सरकारला नाही. आरोग्य सेवेची पूर्तता करण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचे आ. अतुल सावे यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- आयपीएल स्थगितीनंतर सकारिया गेला रुग्णालयात ; घेतली कोरोनाग्रस्त बापाची भेट, म्हणाला…
- लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देऊ नका, रस्त्यातच आडवा;उदयनराजे आक्रमक
- ‘मराठा आरक्षण फडणवीसांनी दिले; एकही मराठा मुख्यमंत्री मराठा आरक्षण देऊ शकला नाही’
- आयपीएल -14 चे उर्वरित सामने कधी आणि कोठे होतील? ‘हे’ आहेत पर्याय
- धक्कादायक! ‘प्रोटोकॉल’ तोडून झारखंडच्या मुख्यमंत्र्यांकडून मोदींच्या संभाषणाचा मजकूर व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

