Share

‘राहुल गांधींचे ट्विटर ब्लॉक करणे हे जुलमी व्यवस्थेचे प्रतिक’ काँग्रेसचा हल्लाबोल

Published On: 

मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्वीटरचे खाते निलंबित करण्यातआल्यामुळे सध्या देशातील राजकीय वातावरण चिघळले असल्याचे सध्या तरी पहायला मिळत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉम असणाऱ्या ट्विटरने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे आणि काही नेत्यांचे अकाऊंट लॉक केले आहे. त्यावर मोठी चर्चा आणि आरोप सुरू आहेत. ट्विटर या मायक्रोब्लॉसिंग साईटने आपले अधिकृत ट्विटर हँडल, तसेच आपले अनेक नेते व कार्यकर्त्यांची ट्विटर खाती तात्पुरती बंद केल्याचा आरोप काँग्रेसने गुरुवारी केला होता.

यावरून काँग्रेसचे नेते नाना पातलो यांनी भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले, ‘राहुल गांधींनी दिल्लीच्या त्या ९ वर्ष्याच्या मुलीवर झालेल्या बालात्कारावर बोलतात. राहुल गांधी त्या तीन काळ्या कायद्यांवर बोलतात. तसेच जनतेच्या हिताचे प्रश्न ते मांडतात. तर त्यांचे ट्वीटर खाते बंद केले जाते. हे कृत्य जुलमी व्यवस्थेचे प्रतिक आहे. जर राहुल गांधींचे ट्वीटर खाते सुरु केले नाही. तर देशातील जनता त्यांच्या सोबत उभा राहून नरेंद्र मोदींच्या सरकारला पाडल्या शिवाय राहणर नाही’ असे आव्हान त्यांनी मोदींना केले आहे.

दरम्यान, कॉंग्रेसने केंद्र देशातील नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान पेगासस ,महागाई, अशा विविध प्रश्नावरून कॉंग्रेसने मोदींना चांगलेच घेरल्याचे दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!