Share

संयुक्त किसान मोर्चासह इतर पक्ष संघटनांच्या वतीने नगर येथे रास्ता रोको

Published On: 

अहमदनगर : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात आज संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने भारत बंदचे ऐलान करण्यात आले आहे. त्यापार्श्वभूमिवर अहमदनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संयुक्त किसान मोर्चासह कामगार संघटना, राजयकीय पक्षांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.

अहमदनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात संयुक्त किसान मोर्चा, आयटक, अहमदनगर जिल्हा हमाल पंचायत, बीडी कामगार संघटनासह विविध राजकीय पक्षांनी सहभाग नोंदविला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको केला.

केंद्राच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात संयुक्त मोर्चाच्या वतीने संपूर्ण भारत बंद आंदोलन सुरु आहे. या बंदला महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना पाठोपाठ सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. या बंद दरम्यान शेतकरी वेगवेगळ्या महामार्गावरील गाड्या तसेच रेल्वे लाईन अडविण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच शेतकऱ्यांनी पंजाब-हरियाणा शंभू सीमा देखील बंद केली आहे. स. ६ ते दु. ४ वाजेपर्यंत शेतकरी रस्ते अडवून निषेध करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!