पुणे : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाचा संसर्ग वाढत आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच, येत्या काळात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नाम फाऊंडेशन व सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी वाढत्या कोरोना प्रादुर्भावासह लॉकडाऊन आणि त्यामुळे होणाऱ्या प्रभावावर भाष्य केलं आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येला फक्त राज्य सरकारला जबाबदार धरता येणार नाही असं भाष्य नाना पाटेकर यांनी केलं आहे.
लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या अनेकांच्या नोकऱ्या, व्यवसाय बंद झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना दोन वेळचे खाणे देखील मुश्किल झाले असून समाजातील सामर्थ्यवान लोकांनी पुढाकार घेऊन त्यांच्या जेवणाची तरी सोय करायला हवी. सरकारला मर्यादा असतात, सरकार तरी कुठं पर्यंत पोहोचणार. तसेच, वाढत्या कोरोना संसर्गाची जबाबदारी नागरिकांची देखील आहे. नियमांचे पालन न झाल्याने हा रोग पुन्हा वाढला आहे. त्यामुळे फक्त सरकारला दोष देऊन चालणार नाही, असं नाना पाटेकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- महाभारत मध्ये ‘देवराज इंद्र’ची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याचे कोरोनामुळे निधन
- संसर्ग वाढतोय आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही – बाळासाहेब थोरात
- राज्यात कडक लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज महत्वाची बैठक
- …तर माझे नाव बदला, देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारवर जोरदार प्रहार
- मोठी बातमी : राज्य सरकार 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

