औरंगाबाद : भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी औरंगाबाद ग्रामीण यांनी जिल्हाधिकाऱ्यांतर्फे घोषित केलेल्या लॉकडाऊन हा व्यापारी वर्गावर अन्याय करणारा आहे. अगोदरच वर्ष भरापासून कोरोनामुळे व्यापाऱ्यांचे अर्थचक्र विस्कळीत झालेले आहे. या बाबत लॉकडाऊनच्या बाबत जिल्हाधिकारी यांना भाजपतर्फे निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, 31 मार्च ते 9 एप्रिल प्रयंत लावण्यात येत असलेल्या लॉक डाऊनचा विरोध व निषेध भाजप करत आहोत. वर्षभरातील बंद काळात सुद्धा बँकेचे हफ्ते त्यावरील व्याज, लाईट बील, दुकानाचे भाडे सरकारी अनेक प्रकारचा टॅक्स, नौकर वर्गाचा पगार, हा बंद काळातला सुद्धा भरावे लागत आहे. बँका कर्ज वसुलीसाठी नोटीसा पाठवत आहे. महावितरण वीज कट करत आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग हा अगोदरच बुडाला आहे. असे असताना तसेच शासन कोरोनाला रोखण्यात आलेल्या अपयशावर पडदा टाकण्यासाठी पुन्हा व्यापाऱ्यांवर तसेच नागरिकांवर लॉकडाऊन चे भूत उभे केले आहे.
लॉकडाऊन हा पर्याय नाही, हे सरकारमधील नेते म्हणत आहेत. असे असताना सुद्धा फक्त आणि फक्त सरकारचे अपयश झाकण्यााठी लावण्यात येत असलेल्या लॉकडाऊनचा भारतीय जनता पार्टीच्या व्यापारी आघाडी औरंगाबाद निषेध करून विरोध देखील करत आहे. अश्या या बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दिले. त्याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष – विनोद मंडलेचा, मराठवाडा संघटक मुकेश जैन, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत जाधवर, उपाध्यक्ष महेश श्रीकांत, चिटणीस संदीप मुथा यांची या वेळी उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- बांगलादेश दौर्यादरम्यानच्या मंदिर भेटीवरून तृणमूलकडून मोदींवर आचारसंहिता भंग केल्याची तक्रार
- चित्रपटातील आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो – उद्धव ठाकरे
- ‘या’ तारखेला विराट आरसीबीच्या कॅम्पमध्ये दाखल होणार
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- ‘बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदींना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

