Share

‘भाजपा आपल्या मित्रांना निर्जीव होईपर्यंत पिळून घेतो’

Published On: 

🕒 1 min read

पटना : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांनी सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत भाजपच्या तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनीही शपथ घेतली असून या दोघांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले आहे.

नितीशकुमार यांचे सरकार स्थापन झाल्यावर आज सकाळी ११.३० वाजता मंत्रमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्र्यांच्या विभागांची विभागणी होणार असल्याचे समजते आहे. तसेच राजकीय आणि कोरोनाच्या पार्श्वभूमिवर चर्चा होण्याची शक्यता वर्वण्यात येत आहे.

दम्यान माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. यशवंत सिन्हा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. नितीश कुमार हे फक्त नामधारी मुख्यमंत्री, भाजपा पिळून फेकून देईल असं म्हटलं आहे.

दरम्यान, संयुक्त जनता दलाचे माजी नेते राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही नितीश कुमार यांच्यावर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे.’भाजपा नामनिर्देशित मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल नितीश कुमार यांचे अभिनिंदन. राज्याला काही वर्षांपर्यंत एका थकलेल्या व राजकीयदृष्ट्या महत्वहीन झालेल्या नेत्याच्या प्रभावहीन सरकारसाठी तयार रहायला हवे.’ असे प्रशांत किशोर यांनी ट्विट केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!