Share

उत्तर प्रदेशात भाजपला धक्का; तीन आमदारांनी सोडला पक्ष

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशच्या निवडणुका (UP Elections) तोंडावर आलेल्या असताना भाजपला तिथे मोठा धक्का बसत आहे. निवडणुकीपूर्वी मंत्री स्वामी मौर्य यांनी राजीनामा दिला त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. स्वामी मौर्य यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी अखिलेश यादव यांची भेट घेत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.

स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या (BJP) आणखी तीन आमदारांनी पक्ष सोडला (3 more MLAs left the bjp party) आहे. कानपूर देहाट आणि बांदा येथील आमदारांनीही भाजपचा राजीनामा दिला आहे. शाहजहांपूरचे तिल्हारचे आमदार रोशनलाल वर्मा यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.

भाजप सोडल्यानंतर रोशनलाल वर्मा (Roshanlal Varma) म्हणाले की, स्वामी प्रसाद मौर्य जिथे जातील तिथे त्यांच्यासोबतच राहू. भाजप सरकारमध्ये आमची उपेक्षा झाली आहे. यूपीमध्ये भाजपचे नाही तर अधिकाऱ्यांचे सरकार आहे. लोकभवनात दोन तास बसायचे. रोशनलाल वर्मा यांनी मंत्री सुरेश खन्ना यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!