Share

मग ते २० टक्के नागरिक कोण? योगींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून पवारांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशसह ५ राज्यांच्या निवडणुका होणार आहे. यापैकी तीन राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे. त्यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत याबाबत वक्तव्य केले आहे. यासोबतच त्यांनी योगी आदित्यनाथ यांनी ८० टक्के जनता आपल्यासोबत असल्याच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली आहे.

“मी काल उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं विधान ऐकलं. त्यांनी उत्तर प्रदेशातील ८० टक्के जनता आपल्यासोबत आहे आणि केवळ २० टक्के जनता विरोधात आहे असं म्हटलं. ते २० टक्के नागरिक कोण? याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं. ते नेमकं कोणाबद्दल बोलत होते? राज्याचा मुख्यमंत्री हा संपूर्ण राज्याचा असतो तो कोण्या एका गटाचा नसतो. त्यामुळे उत्तर प्रदेशात एका धर्माच्या विचारसरणीवर चाललेलं सरकार बाजूला सारणं महत्त्वाचं आहे. देशात सर्वधर्मसमभावाची भावना अधिक बळकट करायची असेल तर उत्तर प्रदेशात भाजपा सरकारला सत्तेतून बाहेर करावंच लागेल”, असे शरद पवार म्हणाले आहेत.

योगींचे ‘ते’ वक्तव्य-

उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, जे राम मंदिरला विरोध करत आहेत त्यांचा सामना ८० टक्के लोकांसोबत आहे. त्यांनी केलेल्या या व्यक्तव्यवरून राजकारण पेटले आहे. योगी आदित्यनाथ त्यातून थेट मुस्लिम समाजाच्या विरोधात बोलत असल्याचा आरोप आता इतर पक्षातील नेत्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!