🕒 1 min read
लातूर : जिल्हा बँकेत भाजपाच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाला मोठा हादरा बसला आहे. काँग्रेस प्रणित पॅनलच्या दबावाखाली हे अर्ज बाद केल्याचा आरोप करत भाजपाने राज्यपालांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ संचालकांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यात काँग्रेस प्रणीत सहकारी पॅनलचे ४ उमेदवार बिनविरोध निवडूण आले आहेत. तर उर्वरित १५ जागांसाठी काँग्रेसच्या उमेदवारांचे ३१ अर्ज शिल्लक राहिले आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी आणखी १० दिवसांचा कालावधी आहे.
पहिल्यांदाच या निवडणुकीत भाजपाप्रणित पॅनल उभे करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र अर्ज छाननीत या पॅनलचा एकही अर्ज टीकला नाही. त्यामुळे काँग्रेस ही निवडणूक जिंकल्यात जमा आहे.
राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील, काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख, जळकोटचे मारोती पांडे, चाकूरचे नागनाथ पाटील यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत.
लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपा उमेदवारांचे सर्वच अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत. सहकार पॅनलचे उमेदवार आमदार बाबासाहेब पाटील आणि आमदार धीरज देशमुख हे बिनविरोध निवडून आल्यानंतर समर्थकांनी अनेक ठिकाणी जल्लोष करत फटाके फोडले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री सावरकरवादीच, कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर…- संजय राऊत
- ‘कोरोनामुळे जीव गमावलेल्या ४.५३ लाख कुटुंबीयांना माफीनामा लिहून द्या’, ‘काँग्रेस’ची मागणी
- भारत-पाक सामन्यापूर्वी BCCI ने उचलले मोठे पाऊल, ‘या’ चार खेळाडूंना दिले मायदेशी परतण्याचे आदेश
- ‘नक्षलवाद आणि दहशतवादाइतकेच गांभीर्याने अमली पदार्थाच्या तस्करीत लक्ष द्यावे’
- WhatsApp ही विदेशी कंपनी, भारतीय कायद्याला विरोध करु शकत नाही; केंद्र सरकारचे खडेबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

