Share

Bhaskar Jadhav | “भाजपचा स्टॉक संपला म्हणून…” ; भास्कर जाधव यांचा मोहित कंबोज यांच्यावर घणाघात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांनी पुन्हा एकदा ट्विट करून महाविकास आघाडीला इशारा दिला आहे. ‘हर हर महादेव अब तांडव होगा’ असे त्यांनी ट्विटरवर लिहिले आहे. त्यांनी ट्विटमध्ये असेही लिहिले आहे की, लवकरच राष्ट्रवादीचा एक मोठा नेता नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्याकडे जाणार आहे. हे ट्विट सेव्ह करा असेही कंबोज यांनी लिहिले आहे. महाराष्ट्र सिंचन घोटाळ्याची पुन्हा एकदा चौकशी करण्याचे संकेत कंबोज यांनी दिले आहेत. यावर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी भाजपला टोला लगावला आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्या हे मराठी लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावून, ईडीच्या चौकश्या लावून थकले आहेत. आता त्यांचा स्टॉक संपला. त्यामुळे मोहित कंबोज समोर आले आहेत. जो अत्याचार, ईडीची कारवाई सर्वांवर होत आहे. हे महाराष्ट्राची जनता पाहत आहे. योग्यवेळी जनता यांना उत्तर देईल, असे भास्कर जाधव म्हणाले.

सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी-

भास्कर जाधव म्हणाले, महाराष्ट्रात अतीवृष्टी झाली आहे. या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. १२५ शेतकरी मृत्यूमुखी पडले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने योग्य ती पाऊले उचलायला पाहीजे होती. तात्काळ मदतीचा निर्णय घ्यायला हवा होता. परंतू तशा प्रकारची कोणतीही मदत झाली नाही. सरकारने फक्त घोषणा केल्या. मात्र घोषणेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही. त्यामुळे या अधिवशेनात सरकारने तात्काळ ठोस मदत शेतकऱ्यांना करावी.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!