मुंबई: काल (१० मार्च) पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागले. युपीत भाजपला प्रचंड मोठी आघाडी मिळत बहुमत प्राप्त झाले. मात्र पंजाबमध्ये त्यांना निराशादायक निकाल मिळाला. सोबतच काँग्रेसचीही पिछाडी झाली. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
“उत्तर प्रदेश निकालापेक्षा आम्ही पंजाब निकालाकडे अधिक गांभीर्याने बघतो. खरं तर नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील संपूर्ण भाजपने आपली ताकत लावली. मात्र तरीही पंजाबमध्ये भाजपला जेमतेम १ जागा मिळाली आहे. सीमेवरील राज्य आहे. संवेदनशील राज्य आहे. कायम अस्वस्थता असते. अशा ठिकाणी भाजपने निवडून येणं गरजेचं होतं. पण त्यांना पंजाब सारख्या राज्याने का नाकारले यावर भाजपला चिंतक करायची गरज आहे.”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
तसेच उत्तर प्रदेश असेल उत्तराखंड असेल त्यांचीच राज्य होती. त्यांनी ती राखली. त्यांचे आम्ही अभिनंदन करतो. मात्र उत्तराखंडचे मुख्यमंत्री पराभूत झाले. गोव्यात दोन उपमुख्यमंत्री पराभूत झाले. आनंद आहे तुम्ही जिंकलात. काल निवडणुका संपल्या आज कामावर लागले आहे. मात्र पंजाब हा पोरखेळ नाही. त्यामुळे पंजाबने भाजपला इतक्या वाईट पद्धतीने का नाकारले यावर सर्वांनी विचार करायला हवा. असेही राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
“उत्तर प्रदेशच्या जनतेने बेरोजगारी, महागाईच्या मुद्द्यांपेक्षा भाजपवर…”,अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
“भाजपच्या विजयात मायावती आणि ओवेसींचे योगदान त्यांना भारतरत्न द्यावा लागणार”, राऊतांचा टोला
विराट करणार सचिनच्या विक्रमाची बरोबरी; माजी कोच म्हणाले “तो १० वर्ष…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

