🕒 1 min read
मुंबई : परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत, येणारे होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमांचे काटेकोर पालन करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला होळी, धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कोरोनाच्या धोक्याची दखल घेऊन सण-उत्सव साजरे करावेत. होळी, धूलिंवदन सण यातून वाईट गोष्टींना हद्दपार करण्याची प्रेरणा घेऊया. निसर्गही रंगाची उधळण करतो. आपल्या आयुष्यातही रंग भरतो. रंग आनंद, सुख-समृद्धी घेऊन येतात. त्यामुळे रंगाचा सण साजरा करतानाही आपल्याला परस्परांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. गर्दी नकोच. एकत्र येणे टाळून कोरोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखणे या देखील परस्परांसाठी शुभेच्छा आहेत. सदिच्छा आहेत, असे मानून सण साजरे करावेत. धार्मिक व सांस्कृतिक परंपरा देखील अशाच पद्धतीने नियम पाळून व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी या सणांच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी वाईट गोष्टींना हद्दपार करण्याची प्रेरणा घेण्याचे सांगताच भाजपचे आमदार आणि नेते अतुल भातखळकर यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. ‘वाईट गोष्टी म्हणजे अकर्मण्यता, खंडणी, टक्केवारी, सूडबुद्धी वगैरे का’? अस ट्विट करत भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
वाईट गोष्टी म्हणजे अकर्मण्यता, खंडणी, टक्केवारी, सूडबुद्धी वगैरे का??? https://t.co/3ae51UifSe
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 28, 2021
महत्वाच्या बातम्या
- म्यानमारमध्ये लष्कराडून आंदोलने चिरडण्यासाठी नि:शस्त्र नागरिकांवर गोळीबार
- अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले, सामनातून मोठा गौप्यस्फोट
- होळी, धूलिंवदन या सणांतून वाईट गोष्टींना हद्दपार करण्याची प्रेरणा घेऊया – मुख्यमंत्री
- युवराज सिंगला दिलासा ‘त्या’ प्रकरणात होणार नाही कोणतीही कारवाई
- अबब! तब्बल सहा वर्षांपासून पाणीपट्टी न भरता धरणातून पाणी उपसा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
