Share

सरकार उगीच पाडता येत नाही, मंत्र्यांची कृत्ये देखील तशीच आहेत; राज ठाकरेंच सूचक विधान

Published On: 

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये काल पुन्हा एकदा टाळेबंदी व उपाययोजनांवर चर्चा झाली आहे. काल ( ५ एप्रिल ) राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी टाळेबंदी, निर्बंध व उपाययोजना ह्या मुद्द्यांवर दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून चर्चा केली. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली याची माहिती दिली आहे.

कोरोनाला अटकाव करण्यासाठीचे उपाय, शाळा-कॉलेज बंद असूनही पूर्ण फी आकारणी, लसीकरण या मुद्द्यांपासून ते पत्रकारांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत विचारलेल्या प्रश्नांपर्यंत आपली भूमिका मांडली आहे. गेल्या दोन महिन्यात महाविकास आघाडी सरकारमधील २ मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे, यामुळे भाजप सरकार पाडण्याचे प्रयत्न करत आहे का ? असा सवाल माध्यमाच्या प्रतिनिधीने राज ठाकरे यांना केला.

यानंतर राज ठाकरेंनी दिलेल्या उत्तरामुळे सध्या चर्चांना उधाण आले आहे. जर कोणी सरकार पाडायचा प्रयत्न करत असेल तर मंत्र्यांचा देखील त्यात दोष आहे, असं विधान राज ठाकरे यांनी केलं आहे. सरकार उगीच पाडले जात नाही, मंत्र्यांची कृत्ये देखील तशीच आहेत. ती काय इमारत आहे का खालचे पिल्लर काढायला. त्या मंत्र्यांकडून असं काही तरी घडतंय म्हणून त्यांना राजीनामे द्यावे लागत आहेत.’ असं भाष्य राज ठाकरे यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!