मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) नेहमीच ठाकरे सरकार तसेच महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर आरोप तसेच टीका करत असतात. या नवीन वर्षाच्या संकल्पावर एक व्हिडियो बनवत त्यांनी असा संकल्प केला की, माफिया सेना मुक्त मुंबई महापालिका करणार आणि घोटाळा मुक्त महाराष्ट्र सरकार करणार असल्याचा संकल्प करत त्यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले होते.
महाविकास आघाडी सरकार तसेच त्यातील नेत्यांवर टीका करण्याचे काम अजूनही त्यांचे सुरूच आहे. अशातच त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sarnaik) यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांच्या मार्फत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर देखील टीका केली आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीवरून देखील किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
"ठाणे येथील विहंग गार्डन चे अनधिकृत बांधकाम करणारे, ११४ सदनिका धारकांची फसवणूक करणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक चे गुन्हे माफ करण्याचा ठाकरे सरकारने निर्णय घेतला असेल, परंतु महाराष्ट्राला लुटणाऱ्या ठाकरे सरकारला जनता कदापि माफ करणार नाही"@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/4smeE4kJGX
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 12, 2022
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर आरोप करताना सोमय्या म्हणाले, ठाणे येथील विहंग गार्डनचे अनधिकृत बांधकाम करणारे, ११४ सदनिका धारकांची फसवणूक करणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे गुन्हे माफ करण्याचा ठाकरे सरकारने निर्णय घेतला असेल, परंतु महाराष्ट्राला लुटणाऱ्या ठाकरे सरकारला जनता माफ करणार नाही, अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- धर्मामुळे कुशल टंडनसोबत ब्रेकअप केलं म्हणणाऱ्यांना गौहर खानचं सडेतोड उत्तर
- आता सर्व दुकानांवर मराठी पाट्याच; राज्य सरकारचा मोठा निर्णय
- औरंगाबादकरांनो सावधान; कोविड नियमांचे उल्लंघन करणे पडणार चांगलेच महागात..!
- ‘…बोलताना जरा विचार करा’; धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात पुन्हा वाद
- धक्कादायक! औरंगाबाद जिल्ह्यातील १२२ गावांमध्ये अजूनही नळ नाही..


