🕒 1 min read
मुंबई: मराठी भाषेच्या मुद्द्यावरच शिवसेनेचा जन्म झाला होता त्यानंतर मनसे पक्षाने देखील याच मराठीच्या मुद्द्यावरून आपली राजकीय वाटचाल सुरू केली. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून अनेकवेळा राजकारण, वाद-विवाद झाले आहेत. मराठी भाषा आणि मराठी अस्मिता टिकवण्यासाठी आता राज्य सरकारने मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता सर्व दुकानांवरच्या पाट्या या मराठी भाषेतच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आज मंत्रीमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनयमन) अधिनियम, २०१७ यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणेच छोट्या दुकानावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील. मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशीही दुरुस्ती मंजूर करण्यात आली.
• दहा कामगारांपेक्षा कमी असलेल्या आस्थापनांना सुद्धा मराठी पाट्या लावणे बंधनकारक
– मंत्री हसन मुश्रीफ
कामगार विभाग @mrhasanmushrif— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 12, 2022
दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले. व त्यासंदर्भात अनेक तक्रारी देखील राज्यसरकारकडे आल्या होत्या. त्यानुसार राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी यासाठी मंत्रालयात संबंधीतांची बैठक घेतली व कायदा सुधारण्याचा निर्णय घेतला.
महत्वाच्या बातम्या:
- औरंगाबादकरांनो सावधान; कोविड नियमांचे उल्लंघन करणे पडणार चांगलेच महागात..!
- ‘…बोलताना जरा विचार करा’; धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात पुन्हा वाद
- धक्कादायक! औरंगाबाद जिल्ह्यातील १२२ गावांमध्ये अजूनही नळ नाही..
- भारत-चीन प्रश्नी लष्कर प्रमुख म्हणाले, ‘युद्ध करायची वेळ आलीच तर…’
- औरंगाबादेतील गर्दीला ‘लक्ष्य’ करणार जिल्हाधिकार्यांनी स्थापन केलेली भरारी पथके..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
