Share

शेतकऱ्यांचे वीज कनेक्‍शन तोडले जात असताना काठावरती पास झालेले राज्यमंत्री गप्प का?

Published On: 

पुणे – कोरोना काळात आर्थिक गणिते बिघडली असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत. यातच महावितरणने भरमसाठ बिले पाठवल्याने गोरगरिबांची अवस्था बिकट बनली आहे. वीज बिलांबाबत सरकारने शेतकऱ्यांचा छळ सुरू केला आहे असा आरोप केला जात आहेत.

लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारने ३०० युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. परंतु ऊर्जामंत्र्यांनी केलेली ही घोषणा केराच्या टोपलीत गेली आहे. आता वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. या सक्तीच्या वसुलीमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे.

दरम्यान, वीज तोडणी मोहिमेमुळे पाण्याअभावी शेती पिके जळून चालली आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही  निर्माण झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने तात्काळ आदेश देऊन कृषीपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.

पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्यात अनेक दिवसांपासून वीजतोडणी मोहीम चालू आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेले राज्यमंत्री वीजतोडणी मोहिमेबाबत गप्प आहेत.सध्या इंदापूर तालुक्याचे काठावरती पास झालेले राज्यमंत्री हे विकासाच्या पोकळ गप्पा मारत आहेत. मात्र सध्याच्या वीज तोडणी मोहिमे संदर्भात सध्या एक शब्दही बोलत नाही.

सध्या उन्हाळा वाढत असून, वीजतोडणी मोहिमेमुळे महाविकास आघाडी सरकारविरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या असंतोषाची दखल सरकारला घ्यावीच लागेल. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नळ पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा ‘महावितरण’ने खंडित करू नये अशी विनंती त्यांनी सरकारला केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!