Share

“…हे ‘मतलबी वारे’ राज्यात पुढे सरकू लागलेत”; आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यातील राजकीय वातावरण निवडणुकांच्या तोंडावर चांगलेच तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात तर रोज आरोप-प्रत्यारोप होत असतात. त्याच सोबत आता निवडणुका जवळ आल्या म्हणल्यावर सत्तेत टिकून राहण्याची धडपड देखील महाविकास आघाडी सरकारला करावी लागत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करामधून सूट देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी घेतला आहे.

मुंबईतल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करामधून सूट देण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजप पक्षाच्या नेत्यांकडून टीकेची झोड उठली आहे. निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला हा निर्णय असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली होती. तसेच त्यांनी आज पुन्हा आपल्या ट्विटर अकाऊंट वरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. आशिष शेलार म्हणतात, आता निवडणूक जवळ येताच ५०० चौ.फु. घरांना मालमत्ता कर माफ! या घोषणेचा पाऊस काल मुंबईत पडला मग ठाणे, नवी मुंबईकडून हे ‘मतलबी वारे’ राज्यात पुढे सरकू लागलेत, अशा शब्दात शिवसेनेवर त्यांनी निशाणा साधला आहे.

शिवसेने सोबतच आशिष शेलार यांनी कॉंग्रेसवर देखील टीका केली आहे. काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात घोषणा केल्या आणि सत्ता आल्यावर ती प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे सांगून वारंवार हात झटकले.. मग तो विषय झोपडपट्टी नियमित करायचा असो, मोफत वीज देण्याचा असो वा मराठा आणि मुस्लिम आरक्षणाचा असो…६० वर्षे घोषणा..फसवणूक आणि प्रिंटींग मिस्टेक..बस्स. असं म्हणत आशिष शेलार यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!