Share

ममता बॅनर्जीना मोठा धक्का! भाजपच्या तक्रारीनंतर न्यायालयात राहावे लागणार हजर

Published On: 

मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal Chief Minister Mamata Banerjee)यांना मुंबई भाजपचे सचिव अॅड विवेकानंद गुप्ता (BJP Secretary Adv Vivekananda Gupta) यांनी केलेल्या तक्रारी वरून मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी समन्स बजावले असून २ मार्च २०२२ रोजी न्यायालयासमोर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

१ डिसेंबर २०२१ रोजी यशवंतराव प्रतिष्ठान येथे प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला ममता बॅनर्जी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अखेरीला राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताच्या सुरुवातीच्या दोन ओळी बसून म्हटल्या आणि नंतरच्या दोन ओळी उभे राहून म्हटल्या.एवढेच नाही तर राष्ट्रगीत सुरू असतानाच त्या तिथून निघून गेल्या. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा अपमान केल्याने भाजपचे सचिव अॅड विवेकानंद गुप्ता यांनी तक्रार दाखल केली होती.

दरम्यान याप्रकरणी विवेकानंद गुप्ता यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी ममता बॅनर्जी यांना २ मार्च २०२२ रोजी न्यायालयासमोर उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!