Share

दरवर्षी अनुभवायला मिळणार भारत-पाकिस्तान मॅचचा थरार?, PCB अध्यक्ष रमीझ राजा ICCला म्हणाले…

Published On: 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिकेवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रमीझ राजा यांच्या मते, दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय मालिका व्हायला हवी कारण जेव्हा हे दोन संघ स्पर्धा करतात तेव्हा ते जगभर पाहायला मिळते.

रमीझ राजा पीसीबीचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना सुरू करण्यासाठी वकिली करत आहेत. अलीकडेच त्यांनी भारत-पाकिस्तानसह ४ संघांचा समावेश असलेली चतुर्भुज मालिकाही सुचवली होती. एका पाकिस्तानी मीडिया हाऊसच्या रिपोर्टमध्ये रमीझ राजाच्या प्लॅनचा उल्लेख करण्यात आला होता.

रमीझ राजा म्हणाले, माझ्या मनात रग्बी सिक्स नेशन-शैलीच्या मालिकेचा प्रस्ताव ठेवण्याची योजना आहे. ही चार देशांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका आहे ज्यामध्ये भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे संघ खेळू शकतात. हा प्रस्ताव आयसीसीच्या बैठकीत ठेवण्याचा मी विचार करत असल्याचे रमीझ राजा यांनी सांगितले.

रमीझ राजा यांच्या मते, “दोन्ही देशांमधील सामने सर्वाधिक पाहिले जातात. ते म्हणाले, टी-२० वर्ल्डकपच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, जेव्हा पाकिस्तान आणि भारत सामना झाला तेव्हा तो सर्वाधिक पाहिला गेला. चाहत्यांना काय हवंय ते पाहावं लागेल आणि त्यानुसार गोष्टी कराव्या लागतील. खेळ आणि चाहत्यांच्या फायद्यासाठी आपल्याला सर्व अडथळे तोडावे लागतील.”

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!