नवी दिल्ली : कोरोना संकटात पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पंजाब कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि माजी मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वाद टोकाला पोहचला आहे. त्याची काँग्रेस हायकमांडने गंभीर दखल घेतली असून तोडगा काढण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे.
दरम्यान, अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर सिद्धू यांच्यासह पंजाबचे 25 मंत्री, आमदार रविवारीच दिल्लीत दाखल झाले असून आजपासून समितीसमोर आपली बाजू मांडत आहेत. यात काँग्रेसच्या किमान २४-२५ आमदार ज्यात प्रदेशाध्यक्ष सुनील झाखडं, मंत्री चरणजीत चन्नी, सुखजिंदर सिंग रंधावा यांचा समावेश आहे.
निवडणुकीत काँग्रेसने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने आता पक्षाच्याच आमदारांनी स्वपक्षीय सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याविरोधात आघाडीवर असलेले पंजाब काँग्रेसचे नेते व आमदार नवज्योत सिंग सिद्धू यांचा देखील यामध्ये समावेश होता. या पॅनलशी चर्चा केल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रया दिली.
I came here to present people's voices from grass root level to High Command. My stand on democratic power remains the same. The power of the people must return to the people. I have clearly stated the truth: Navjot Singh Sidhu, Punjab MLA after meeting Congress leaders in Delhi pic.twitter.com/38HlKbPR31
— ANI (@ANI) June 1, 2021
“मी इथं तळागाळातील लोकांचा आवाज हायकमांडकड पर्यंत पोहचवण्यासाठी आलो आहे. लोकशाही सत्तेबाबतची माझी भूमिका तशीच आहे. जनतेचे अधिकार जनतेला परत मिळाले पाहिजे. मी स्पष्टपणे सत्य सांगितलं आहे.” असं सिद्धू यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुढची 100 वर्षे तुमची सत्ता येणार नाही, हे पवारांनी फडणवीस यांना सांगितले असेल’
- पुन्हा अशीच गर्दी होत राहिल्यास निर्बंध अधिक कठोर केले जातील; मुख्यमंत्र्यांचा इशारा
- मराठा समाजाने राज्यसरकारने जाहीर केलेल्या EWS आरक्षणाचा लाभ घ्यावा – मलिक
- ‘आदित्य ठाकरेंसाठी मुलगी पाहायची झाली तरी हे केंद्राला सांगतील’
- २० वर्षांनी थिरकले गोविंदा- नीलम `या` गाण्यावर, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

