मराठवाडा : खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. या पाश्वर्भूमीवर राज्य सरकारने खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन वाढीबरोबरच काढणी पश्चात त्याचे नुकसान कसे टाळता येईल यासाठी धोरण ठरवले आहे. याबाबद कृषी अधिकाऱ्यांची बैठक कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून धोरण ठरविण्यात आले आहे.
नुकसान होण्यापूर्वीच उपाययोजना राबविण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न होणार आहे. यामध्ये आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा आणि धोके ओळखून ते टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सोयाबीन हे खात्रीचे पिक मानले जाते. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी विकास आराखडा तयार करून धोका टाळण्याचा प्रयत्न मूल्यसाखळीच्या आधारे केला जाणार आहे.
तसेच शेतकऱ्यांना बिजोत्पादन, प्रक्रिया धारकांना योग्य मालाचा पुरवठा ही जबाबदारी कंपन्यांची राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
मोठा खुलासा! 2 महिन्यापेक्षा जास्त काळ संजय राऊतांचा फोन टॅप; चौकशी सुरू
VIDEO : “मजा येतेय का?”, मॅचमध्ये आऊट केल्यानंतर विराटला सामोरं गेला ‘BABY AB’! मग पुढं काय झालं पाहा!
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला खतपाणी कुणी घातले?; जयंत पाटलांचा सवाल
राज ठाकरेंच्या नातवाची पहिली झलक; अमित ठाकरेंची पोस्ट व्हायरल
“सोमय्या पिता-पुत्रांना जामीन देऊ नका”,मुंबई गुन्हे शाखेची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

