नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनचा आज ७४ वा दिवस आहे. दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनेनंतर शेतकरी आंदोलनाचं सिंधू बॉर्डरवर असलेलेलं केंद्र आता गाझीपूर बॉर्डर बनलं आहे. या ठिकाणाहून अखिल भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी घोषणा केली आहे की, केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गाझीपूर सीमेवर सुरु असलेलं शेतकरी आंदोलन महात्मा गांधी जयंती अर्थात २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या ७४ दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही या प्रश्नावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. अशा स्थितीत गाझीपूर सीमेवर सुरु असलेलं शेतकरी आंदोलन २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनेनंतर शेतकरी आंदोलनाचं सिंधू बॉर्डरवर असलेलेलं केंद्र आता गाझीपूर बॉर्डर बनलं आहे. या ठिकाणाहून अखिल भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी घोषणा केली आहे की, गाझीपूर बॉर्डरवर ज्या ठिकाणी पोलिसांनी खिळे ठोकले होते. त्या ठिकाणी आपणं फुलं लावणार आहोत आणि त्यासाठी २ ट्रक माती मागवल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- दत्ता भरणे मंत्री झाले पण कधी जॅकेट घातलं का?; अजित पवारांचे हर्षवर्धन पाटलांना चिमटे
- मराठा आंदोलन: ठिय्या आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
- प्लास्टिक वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर सिल्लोड नगर परिषदेची कारवाई
- कृषी कायदे मागे घ्या…अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होईल : बच्चू कडू
- ‘शरजील उस्मानी ही घाण उत्तर प्रदेशातून आली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
