नवी दिल्ली: केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामण यांनी सकाळी 11 वाजता लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले. यावेळी कोरोना काळात अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांबरोबरच उद्योजकांना देखील दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तर गेल्या वर्षभरात अर्थव्यवस्थेची होत असलेली पडझड लक्षात घेता यंदाचा अर्थसंकल्प यावर काय उपाययोजना आणणारा ठरतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
यामध्ये सीतारामण यांच्याकडून अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या यामध्ये केंद्र सरकार दोन सरकारी बँका विकणार असल्याची घोषणा सीतारामण यांनी आज केली. त्याचबरोबर एका विमा कंपनीचं तर दोन सरकारी बँकांचे खासगीकरण करण्यात येणार आहे किंवा त्या विकल्या जातील असे यावेळी अर्थमंत्री सीतारमण यांनी जाहीर केले.
गेल्या काही दिवसांपूर्वी पासूनच सरकारकडून देशातील कंपन्या आणि बँका यांच्या खाजगीकरणाच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. आज त्यावर अर्थसंकल्पा दरम्यान शिक्कामोर्तब करण्यात आल आहे. तसेच सरकारी कंपन्यांचे अतिरिक्त भूखंडही विकले जाणार आहेत. तसेच सरकार आयडीबीआय बँकेचेही खासगीकरण करणार असल्याची घोषणा सीतारामण यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ग्रामीण भागातील सामान्य महिलेचा प्रश्न केंद्र सरकारला कळत नाही का ? – जयंत पाटील
- #Budget2021 : मध्यमवर्गीय,बेरोजगार तरुणांच्या अपेक्षा बजेटमधून पूर्ण होणार का?
- #Budget2021 : यंदाच्या अर्थसंकल्पात गरिबांसह शेतकऱ्यांना प्राधान्य राहण्याची शक्यता
- #Budget2021 : शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या हिताचं बजेट असावं : संजय राऊत
- अहमदनगर जिल्हा बँक निवडणूक; पारनेर तालुक्यातील दिग्गजांमध्ये होणार लढत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

