Share

केंद्राचा मोठा निर्णय; पाकसह बांगलादेश, अफगाणिस्तानातील मुस्लिमेतर व्यक्तींना नागरिकत्व देणार

Published On: 

दिल्ली : देशातल्या तेरा जिल्ह्यांमध्ये जे बिगर मुस्लिम विदेशी निर्वासित राहात आहेत त्यांना भारताचे नागरिकत्व देण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला असून त्यासाठी त्यांनी अशा नागरीकांकडून अर्ज मागवले आहेत.

गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, हरियाना आणि पंजाब मधील तेरा जिल्ह्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या निर्वासितांसाठीच ही अधिसूचना आहे. 1955 च्या नागरीकत्व कायद्यानुसार हे नागरीकत्व दिले जाणार आहे. त्याचे नियम सन 2009 मध्ये निश्‍चीत करण्यात आलेले आहेत. सीएए म्हणजेच नागरीकत्व दुरूस्ती कायद्यान्वये ही अधिसूचना काढण्यात आलेली नाही असेही गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

नागरिकत्व कायदा १९५५ च्या कलम १६ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून केंद्र सरकारनं ही अधिसूचना जारी केली आहे. या कायद्याच्या कलम ५ अंतर्गत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिक म्हणून नोंदणी करता येईल किंवा कलम ६ अंतर्गत भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र दिलं जाऊ शकते.

ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या अर्जांची व्यापक छाननी करून नंतरच त्यांना नागरीकत्व दिले जाणार आहे. बांगलादेश, पाकिस्तान, आणि अफगाणिस्तानातील हिंसाचाराला घाबरून जे अल्पसंख्याक निर्वासित भारतात आश्रयला आले आहेत त्यांना या निमीत्ताने आता भारताचे कायदेशीर नागरीकत्व मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!