मुंबई : येत्या ९ एप्रिल पासून आयपीएलचे नवे सत्र सुरु होत आहे. सलामीचा सामना हा मुंबई इंडियन्स आणि आरसीबी संघात चेन्नई येथे होणार आहे. मात्र यापुर्वीच आयपीएलच्या काही संघासाठी चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. ही बातमी मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपीटल या संघासाठी आहे.
आयपीएलच्या सर्व संघानी स्पर्धेच्या तयारीला सुरुवात केली आहे. प्रत्येक संघाच्या सराव शिबीरात सरावालाही सुरु झाली आहे. मात्र दिल्ली, चेन्नई आणि मुंबई संघातील काही प्रमुख खेळाडू हे आयपीएल स्पर्धेत दिसण्याची शक्यता कमीच आहे. याचा परिणाम संघाच्या कामगीरीवरही होऊ शकतो. सध्या दक्षिण अफ्रिका आणि पाकिस्तान संघात २ एप्रिलपासून क्रिकेट मालिका सुरु होणार आहे. या स्पर्धेत क्विंटन डीकॉक, रबाडा, नॉर्तजे, एनगीडी आणि मिलर हे आयपीएलमधील काही सामने खेळू शकत नाही.
ही मालिका संपल्यानंतर या खेळाडूंना कोरोना नियमामुळे आयपीएल स्पर्धेत थेट खेळता येणे अशक्य आहे. डीकॉक हा मुंबई इंडियन्सकडून सलामीला खेळत असतो. तर रबाडा आणि नॉर्टजे हे दिल्लीच्या संघाचे प्रमुख गोलंदाज आहे. तर निगडी हा चेन्नईच्या संघाकडून गोलंदाजी करतो. या स्पर्धेत कोणत्याही संघाचे सामने हे घरच्या मैदानावर होणार नाही. तर प्रत्येक संघाला कमी वेळ प्रवास करावा लागेल याची व्यवस्था आयपीएल गव्हर्नीग कॉन्सीलने केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक! जमिनीच्या लालसेपोटी पत्नीला संपवलं
- दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराची झाली निवड, अजिंक्य, पृथ्वी शॉ स्पर्धेतून बाहेर
- ‘लोकांनी बेदरकारपणा थांबवला नाही तर कडक पावले उचलण्याशिवाय पर्याय नाही’
- ना तुम जानो ना हम… दोन्ही संघांना टार्गेटच नाही कळलं
- शाब्बास लातूरकर! ९८ हजार जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

