मुंबई : इंग्लंड विरुद्धचा पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णीत झाला. अखेरच्या दिवशी भारताला १५७ धावांची गरज होती. मात्र अखेरच्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने एकाही चेंडुचा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे पावसामुळे विजयाने भारताला हुलकावणी दिली.
भारत आणि इंग्लंड संघादरम्यान दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स येथे १२ ऑगस्टपासुन सुरु होणार आहे. या सामन्यापुर्वी इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. सरावादरम्यान इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे. यामुळे ब्रॉडला चालताही येत नव्हते. यामुळे भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला तो मुकण्याची शक्यता आहे. मात्र त्याची दुखापत किती गंभीर आहे याबद्दल अद्यापही खुलासा करण्या आलेला नाही. जर त्याची दुखापत गंभीर असली तर तो संपुर्ण मालिकेतून बाहेर पडु शकतो.
जखमी ब्रॉडच्या जागी इंग्लंडच्या संघात मार्क वुडला संधी देण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे. तसेच भारताचा अष्टपैलु खेळाडू शार्दुल ठाकुरही जखमी झाल्याने दुसरा सामन्यातून बाहेर पडु शकतो. त्याच्या मांसपेशीमध्ये तणावामुळे त्याचे खेळणे अनिश्चीत मानले जात आहे. पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णीत राहिल्यामुळे दुसरा कसोटी सामना जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पालक आणि विद्यार्थी चिंतेत, ठाकरे सरकारने शिक्षणाचा बट्ट्याबोळ करुन टाकला आहे’
- ‘व्यंकय्या नायडूंना सभागृहात अश्रू अनावर’, ‘यामुळे’रात्रभर झोपू शकले नाही
- सोलापूर जिल्ह्यावर लादण्यात आलेल्या निर्बंधांना व्यापारी महासंघाने केला तीव्र विरोध
- ‘खेळाडूंना ओळखण्यासाठी शेजाऱ्याकडून चष्मा उधार घ्यावा लागेल’, सोशल मीडियावरून मोदींवर टीका
- निर्बंध शिथिल करण्याबाबत पुण्याला वेगळा आणि सोलापूरला वेगळा न्याय का ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
