टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
गेले चार दिवस गुहागरचे आमदार भास्कर जाधव व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याची चर्चा सुरू होती. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे समजताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. मात्र, अशी भेट झाली नसल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत होते. अखेर याबाबत जाधव यांनी स्वतः भेट झाल्याचा खुलासा केला.
मुलगा विक्रांत जाधव याच्यासाठी गुहागरमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडे तिकीट मी मागितले आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. तर दुसरीकडे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि माझी भेट मुंबईत झाली. याभेटीत मनमोकळ्या गप्पा झाल्या, सगळ्याच विषयांवर झाली चर्चा, असा भास्कर जाधव यांनी खुलासा केला आहे.यामुळे राष्ट्रवादीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या
आता रिफायनरी प्रकल्पाला विरोध नको म्हणून पेट्रोलियम मंत्री थेट मातोश्रीवर
शरद पवार आणि छगन भुजबळ यांची भेट, शिवसेना प्रवेशाबाबत चर्चा होण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

