Share

भारतबंदचा ट्विटरवरही बोलबाला, सोशल मिडीयावरही शेतकऱ्यांचे प्रश्न गाजू लागले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : संयुक्त किसान मोर्चाने आज कृषी कायद्यांच्या विरोधात भारत बंदचे ऐलान केले आहे. ट्विटरवर ‘#आज_भारत_बंद_है’ हा ट्रेड एक नंबरला असून आतापर्यंत २ लाख ८३ हजार ट्विट या हॅशटॅगखाली करण्यात आले आहेत. त्या खालोखाल तीन नंबरवर ‘#भारत_खुला_है’ हा ट्रेडही सत्ताधारी पक्षाकडून वापरण्यात येत आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने लोकशाहीची सर्व मुल्ये, परंपरा पायदळी तुडवत बहुमताच्या जोरावर नवीन कृषी व कामगार कायदे बनवले. या कायद्यांविरोधात देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत पण मोदी सरकार आपला ताठरपणा सोडायला तयार नाही.

या आंदोलनात आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त शेतक-यांचा मृत्यू झाला आहे. हे जुलमी, न्यायी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी शेतकरी संघटनांकडून आज भारत बंद करण्यात आला असताना पंतप्रधान मोदी मात्र विदेशी गेले आहेत. हा अहंकार असून मोदी सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

https://twitter.com/Kisanektamorcha/status/1442352774461616134

 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!