Share

यामुळे श्रीलंका दौऱ्यात अय्यर आणि नटराजनला नाही मिळाले स्थान, खरे कारण आले समोर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. आगामी सप्टेंबर महिन्यापर्यंत भारतीय संघ इंग्लंडमध्येच असणार आहे. इंग्लंड दौऱ्याचा भाग नसलेल्या भारतीय खेळाडुंचा दुसरा संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व हे शिखर धवन करणार आहे.

मात्र या दौऱ्यात श्रेयस अय्यर आणि टी नटराजन यांना या दोन महत्वाच्या खेळाडुंना भारतीय संघात स्थान मिळाले नाही. श्रेयस अय्यर आणि टी नटराजन हे दोन्ही खेळाडू काही दिवसापुर्वी दुखापतग्रस्त झाले होते. काही दिवसापुर्वीच दोघेही दुखापतीतून सावरले असुन पुनरागामन करण्याच्या तयारीत होते. मात्र श्रीलंका दौऱ्यापुर्वी दोन्ही खेळाडु पुर्णपणे दुखापतीतून सावरले नसल्यामुळे त्यांच्या फिटनेसबद्दल बीसीसीआयला कोणतीही जोखीम उचलायची नव्हती. आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेत हे दोन्ही खेळाडु भारतीय संघात महत्वाची भूमिका बजावु शकतात. त्यामुळे या दोन्ही खेळाडुंना या दौऱ्यात संधी नाकारण्यात आली.

यावर्षी मायदेशीतील इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासुन तो क्रिकेटपासुन दुर आहे. तर आयपीएल 2021 स्पर्धेदरम्यान टी नटराजनची गुडघ्याची दुखापत वाढल्याने त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासुन तोही क्रिकेटपासुन दुर आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!