Share

सावधान ! राज्यात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा धोकादायक 

Published On: 

मुंबई : कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तरी देखील अनेक नागरिक कोरोनाच्या नियमनाचे पालन करताना दिसत नाही. लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

गेल्या २४ तासांमध्ये राज्यात तब्बल २५ हजार ६८१ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ३ हजार ६२ कोरोना बाधित हे मुंबईत सापडले आहेत. शहरात दिवसभरात १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चिंतेची बाब म्हणजे आत्तापर्यंत मुंबईत एका दिवसात सापडलेले हि सर्वाधिक संख्या आहे. पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासातं 2834 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात ८०८ रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. रुग्णांचा गेल्या २४ तासात पुण्यात कोरोनाबाधीत २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्य सरकारकडून नियमावली जाहीर –
राज्यातल्या सर्व खासगी ऑफिसेसमध्ये ५० टक्केच उपस्थिती ठेवावी,
नाट्यगृहं आणि सभागृहांमधली उपस्थितीही ५० टक्के ठेवावी.
सभागृहांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे. सभांसाठी करता येणार नाही.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!