मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याने भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये एक उत्साह संचारला असून भाजपा-शिवसेनामध्ये खरा सामना रंगणार आहे. तो महापालिका निवडणूकीमध्ये. दरम्यान, त्याच अनुशंगाने मुंबईत अमित शाह यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. यामध्ये अमित शाह यांनी ज्यांनी धोका दिला त्यांना माफी नाही, असे म्हणत शिवसेनेविरोधात आता थेट भूमिका घेतली आहे. मात्र, हे सर्व होत असले तरी भाजपाचा राज्यात विस्तार आणि केंद्रात केलेले सहकार्य यामुळे उपकाराची जाणीव ठेवा असा सल्लाच अरविंद सावंत यांनी भाजपाला दिला आहे.
2019 च्या निवडणूकांपूर्वी सेनेला असेच अव्हान देण्यात आले होते. मात्र, निकाल समोर येताच हेच अमित शाह हे मातोश्रीवर दाखल झाल होते. त्यानंतरच लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय झाला होता. त्या दरम्यानच, विधानसभा निवडणूकांचे स्वरुप कसे असणार हे देखील ठरल्याचे अरविंद सावंत यांनी सांगितले. एवढेच नाही तर जागा वाटपही कसे असणार निश्चित झाले होते. पण आकड्यांचा खेळ जुळला नाही आणि भाजपानेच शिवसेनेला धोक्या दिल्याचे सावंतांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Kishori Pednekar । ‘खोके-धोके’ कोण कुणाला देतंय हे जनतेला ज्ञात; शहांच्या वक्तव्यावर पेडणेकरांचा पलटवार
- Nitin Gadkari | रस्ते अपघातांना निकृष्ट प्रकल्प अहवाल जबाबदार, नितीन गडकरींचा खुलासा
- Nilam Gorhe | “आम्हाला कोणाच्या दयेची आणि कृपेची गरज नाही”
- Katrina Kaif | आलिया आणि रणबीरच्या हनिमून वर कतरिना बोलली असं काही की…
- Arvind Sawant | मुंबईतील शिवसेनेचा भगवा झेंडा कोणीही काढू शकणार नाही – अरविंद सावंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

