मुंबई : भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यातील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना गेल्या वर्षी यूएई आणि ओमान येथे झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळला गेला होता. या सामन्याची तिकिटे काही तासांतच विकली गेली. यावरून या दोन देशांच्या सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये किती उत्सुकता आहे, हे समजू शकते. मात्र, २०१२ पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही. ते फक्त आयसीसी किंवा मोठ्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. दरम्यान, पीसीबीचे माजी अध्यक्ष तौकीर झिया म्हणाले, ”समस्या दोन बोर्डांमधील नाही, तर समस्या दोन्ही बाजूंच्या सरकारमधील आहे.”
क्रिकेट पाकिस्तानशी बोलताना तौकीर झिया म्हणाले, ”बीसीसीआयने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास कधीही नकार दिला नाही. बीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा या दोघांनाही क्रिकेटचा प्रचार करायचा आहे. देशातील दोन्ही क्रिकेट बोर्ड माजी खेळाडू चालवत आहेत. अशा स्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची उपयुक्तता त्यांना माहीत आहे. गांगुली आणि रमीझ दोघांनाही क्रिकेटचा प्रचार करायचा आहे. दोन देशांमधला क्रिकेट सामना यापेक्षा काहीही चांगले असू शकत नाही.”
"BCCI has never refused to play against us [Pakistan]. The problem lies on the government-to-government level"https://t.co/MrLUa5CSAi
— CricWick (@CricWick) April 30, 2022
या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारत आणि पाकिस्तानला पुन्हा एकदा एकाच गटात ठेवण्यात आले आहे. या सामन्याचीही चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याशिवाय पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे. येथेही भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना पाहायला मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

