पुणे : एल्गार परिषदेच्या प्रकरण हे बनावट असून त्याबद्दलचं पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी लिहले होते. ही कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावी व केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करावा, त्याचबरोबर केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबतोय, हे या कागदपत्रांवरून उघडकीस येईल. त्यामुळे शरद पवारांना विनंती आहे की, त्यांनी बोगस कागदपत्रे सार्वजनिक करावीत, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
त्याबाबत राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे की, एल्गार प्रकरण बोगस असून, संबंधित कागदपत्रे बनावट तयार करण्यात आली आहे. त्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. असे पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. या प्रकरणातील खोटी कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे पवारांना माहिती झाले आहे, तर त्यांनी ती कागदपत्रे सार्वजनिक करावी. त्यामुळे केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबत आहे याची माहिती लोकांना होईल.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/1446502818892455/
महत्वाच्या बातम्या :
- कांदा निर्यात बंदी : काँग्रेसचे मोदी सरकार विरोधात राज्यव्यापी आंदोलन
- सिनेसृष्टी ‘गटार’ नाही, सामनाने केले जया बच्चन यांच्या भूमिकेचे समर्थन तर कंगनाला काढला चिमटा
- राज्यात सप्टेंबर अखेर शाळा सुरू होणे अवघडच; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
- नगर-मनमाड महामार्गासाठी आ.विखे उतरणार रस्त्यावर
- लोक आता नोकरी तरी वाचू देत अशी प्रार्थना करत आहेत ; भाई जगतापांची भाजपवर मार्मिक टीका


