🕒 1 min read
अमरावती: २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघातून निवडणूक लढते वेळी निवडणूक प्रतिज्ञा पत्रात मुंबई येथील त्यांच्या नावाने असलेल्या फ्लॅटची माहिती दिली नव्हती त्यामुळे बच्चू कडू यांच्या विरोधात न्यायालयाने निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभा निवडणूक लढवताना २०१४ मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना मुंबईच्या या घरावर आम्ही कर्ज घेतले होते त्या घराचा उल्लेख करण्याऐवजी कर्ज घेतलेल्या रकमेचा उल्लेख केला होता. हा काही गंभीर प्रकार नव्हता मात्र या प्रकरणात न्यायालयाने आज जो काही चुकीचा निर्णय दिला आहे त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञा पत्रात मुंबई येथील प्लँटची माहिती लपवल्याने त्यांना चांदुरबाजार येथील न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावास व २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता, यात न्यायालयाने बच्चू कडू यांना जामीन सुद्धा दिली आहे. या नंतर बच्चू कडू यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हणले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “संजय राऊतला एवढी मस्ती, गुर्मी आहे की..”; सोमय्या आक्रमक
- IND vs WI: गब्बर इज बॅक.. फॉर्म मात्र इनकमिंग
- उद्धव ठाकरेंनी साधला भाजपवर निशाणा
- महत्त्वाचं काय आहे? देश की धर्म?” हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल!
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद रत्नागिरी दौऱ्यावर, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळगावाला देणार भेट


