औरंगाबाद : औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसात सतत सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शहरातील गरीब नागरिकांना मदत करण्याची मागणी औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीद्वारे करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या मागणीला यश आले आहे.
औरंगाबाद शहरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गरीब नागरिक तसेच छोट्या व्यापाऱ्यांना शासनातर्फे आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना काँग्रेस कमिटीने केली होती. यावेळी वडेट्टीवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीदरम्यान शहरात झालेल्या मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानीबाबत शासनाच्या वतीने आर्थिक मदत करावी असे आदेश दिले. तसेच काँग्रेस पक्षाच्या बैठकीतही औरंगाबाद शहरातील झालेल्या मुसळधार पावसामुळे गरीब कुटुंबीय तसेच लहान-लहान व्यापारी यांना शासनातर्फे मदत करण्यात येईल असे जाहीर केले.
यावेळी त्यांनी महाराष्ट्र शासन नेहमीच तत्पर असून सामान्य माणसाला या मुसळधार पावसामुळे झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीबाबत त्वरित शासनातर्फे मदत करावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत. यावेळी शहर अध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी विजय वडेट्टीवार यांना शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसानीबाबत सविस्तरपणे माहिती दिली. या कार्यक्रमात डॉ. कल्याण काळे, हिशाम उस्मानी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी इब्राहिम पठाण, नामदेव पवार, ज्येष्ठ नेते प्रकाश मुगदिया उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘काही दिवसांत अर्धे मंत्रिमंडळ गायब आणि अर्धे रुग्णालयात दाखल झालेले दिसतील’
- सोमय्यांनी गंभीर आरोप केलेला, भावना गवळींचा निकटवर्तीय असलेला सईद खान आहे तरी कोण?
- ‘माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती’, परळीकरांच्या स्वागताने जयंत पाटील भारावले
- तत्कालीन फडणवीस सरकारच्या ‘जलयुक्त’ घोटाळ्याची खुली चौकशी सुरू
- मुसळधार पावसाचा राज्यात धुमाकूळ; यवतमाळमध्ये एसटी बस वाहून
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

