औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा चर्चेत आला आहे. औरंगाबाद की संभाजीनगर हे राजकारणाचे खेळणे झाले आहे. अशी टिका जनता दल सेक्युलरतर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. पी. डी. जोशी पोटोदेकर, साजेदा निहाल अहमद, अॅड. जयप्रकाश घोरपडे यांची उपस्थिती होती.
मराठवाड्याच्या विकासावर सर्वांनी एकत्र होऊन विकास प्रक्रिया राबविणे आवश्यक असताना भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी ही मंडळी होऊ देत नाही. सातशे वर्षांपूर्वी ज्या प्रमाणे शासक वागले त्या प्रकारे वागून ही मंडळी सातशे वर्षांसारखे पुराणमतवादी आहे ते सिद्ध करत आहे.
ऐतिहासिक पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. जायकवाडी धरण भरलेले असताना नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. सर्व राजकारण्यांनी राजकारणाऐवजी औरंगाबदच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्राने पंडित नेहरुंप्रमाणे काम करावे; भंडारा दुर्घटनेनंतर सामनातून केंद्राकडे बोट!
- मराठा आरक्षणासंदर्भात आज नवी दिल्लीत वकिलांची बैठक
- आमच्या सुरक्षेत कपात केल्याने आमच्या कामात तसूभर ही फरक पडणार नाही – दानवे
- अभिनेत्री ईशा देओलचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक; ट्विट करून चाहत्यांना दिली ‘हि’ सूचना
- औरंगाबादेत सध्या 422 रुग्णांवर उपचार, दिवसभरात 36 कोरोनामुक्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
