Share

Atul Bhatkhalkar : “…राजकारणाचा हा शेवटचा अंक”, ‘त्या’ वक्तव्यावरून अतुल भातखळकरांचा संजय राऊतांना इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेनेशी बंड पुकारणारे एकनाथ शिंदे यांनी “आमदारांच्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे, याची जबाबदारी सरकारची असते”, असा गंभीर आरोप केला आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आमदारांना सुरक्षा असते, त्यांच्या कुटुंबियांना नाही असे म्हटले आहे. यावरच भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्वीट करत टीका केली आहे.

“सूडाच्या राजकारणाचा हा शेवटचा अंक ठरणार आहे. चालू द्या… तुमचाही हिशोब होईलच!”, असे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी एकप्रकारे महाविकास आघाडी सरकारलाच इशारा दिला आहे.

नेमके काय म्हणाले संजय राऊत?

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आरोप केला आहे की, आमदारांच्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. याची जबादारी सरकारची असते. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटले की, “ते महाराष्ट्राच्या बाहेर आहे. त्यांनी ढुंगणाला पाय लावून राज्यातून पलायन केले आहे. त्यांना आमदार म्हणून सुरक्षा आहे. आमदारांना सुरक्षा असते कुटुंबियांना नाही.  महाराष्ट्रात या, आपल्या राज्यात या. असे वणवण का फिरताय?भिकाऱ्यासारखे फिरू नका. तुम्ही वाघ आहात बकरीसारखे का म्या म्या करत आहात.”

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!